विचारांचे डोंगर पोखरून..... काही मिळालं नाही.....
कोण तु......कोण मी ......कोण कोणाला बांधील?
छे! अव्यक्ताची भिल्लं पोरं.....जीवाची काहिली..... पाडतात खिंडारं....
त्यातून पडते फक्त माती..... ती ही भुसभूशीत....!
हे विवेचन आहे की विवंचना...... की फक्त मानसिक संरचना.....
हा शोध कुणाचा.....तुझ्यातला माझा...की माझ्यातला तुझा?
खेळ्तोय आपण ब्लाईंड-गेम..... तीन पत्ता......
ही लपाछपी ....... की पाठशिवणी ...... पकडलं गेलो तरी....
राज्यं आपल्यावरंच...!!!
मग आटापिटा जिवाचा..... खटाटोप डाव जिंकण्याचा.....
मांडलेली गृहितकं पण फसतात.... मग दोन थेंब आसवं.....
बाकी सारं नगण्य......!!!
ही भुपाळी आहे की भैरवी...
सुरुवात आहे की...... न पेरताच........ रुजवात....
हा माझा हस्तक्षेप..... की तुझा वरदहस्त....?
धडपड...... चाचपड...... मिळते फक्त अधमर......!!
काही वर्षांनी सापडतील ......
तुझ्या-माझ्या विचारांची..... गुंतलेली जिवाश्म...... अजस्त्र!!!!
हे काय आहे अशारीर...... सदोदित......
डोकं जातंय भंजाळून ......
आणि मग परत शोधच होतोय सारखा..... अधोरेखित.....!!!!!
------ चैताली.
Monday, November 17, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
फक़त एक उसासा!!!
-अभी
खूप वजनदार आहे एकेक शब्द.. निशब्द करून टाकणारा..!
Post a Comment