मला नेहमीच असं वाटतं....
माझ्या भोवतालचा अंधार....तूझ्या पायरवाने दूर सारशील....
तूझे सापेक्ष आक्षेप....माझ्यात उतरतील न उतरतील....
पण तूझं आरसपानी मन माझ्या जळावर डचमळत राहील.....
नुकतेच व्यालेले माझे शब्द....तूला भाबडलळा लावतील...
उन्हाचा चटका बसल्यागत तु हात असोशीने मागे घेशील...
पण तूला पुन्हा लगडतील.... माझी प्रकाशवलयं....!!
सारखं हटकू नकोस माझ्या पापण्यांच्या विभ्रमाला...
नाहीतर माझे हासू....उंबराची फूलं बनून तूझ्या स्वप्नी येतील....
माझ्या ओठांच्या (इमानी) कमानी...भुवयांची महिरप...
पापण्यांचे तोरण...विखरून ठेव....तूझ्या तप्त हस्तरेषांवर....
विघटन होणारा अंधार पुन:र्जिवित होण्याच्या आत....
सावल्यांवर लक्ष केंद्रित कर....
अन कवडश्यांवर नाचणारे रज:कण....पापण्यांवर गोळा कर.....
त्यांची सोनेरी आभा (आभास) कल्पोकल्पित कपोलांवर पखरत रहा....
अन हो मोकळा एकदाचा....
प्रकाशाच्या सावलीच्या ऋणातून....
तोपर्यंत मी आलेच.....
माझे झपूर्झा घालणारे....
अश्रू.....निचरून.....!!
-----चैताली.
Friday, November 14, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
beautiful poem and very touching...
best wishes
पुनश्च षटकार!!!
खूपच छान!!!
-अभी
Post a Comment