पून्हा तेच.....विरक्तीचं सुक्त गात.....
माझ्यातली मी मिटून जाते...
आणि माझ्या डोळ्यांतलं रितेपण..
अनोळखी माणसानं पण जाणावं...
इतपत भरून येतं.....
मग परत एकदा मी तूला साद घालते...
तूझ्या कूशीची आस धरते...
ही दोघांमधली अभेद्य तटबंदी ओलांडणं सोपं नाही....
बरं आहे ना....
काही झरोके आहेत....कवितांचे...शब्दांचे....
ज्यातनं एकमेकांना डोकावून बघू शकतो आपण.....
सतर्कतेच्या परिसीमा जीथे संपतात....
तिथेच तर आपलं नातं सुरू होतं..
फक्त एक लक्षात ठेव.....
सादेला प्रत्यूत्तर दिलं नाहीस तर.....
कदाचित मी मिटून जाईन....
पुन्हा कधीही उभी राहू शकणार नाही...
इतकी कोलमडून जाईन....
तरीही....
तरीही खोल आत माझ्यात तूला धुगधूगी जाणवेल....
ती सवय मोडणारंच नाही अशी.....
माणसांवर विश्वास टाकण्याची....!!
-----चैताली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सतर्कतेच्या परिसीमा जीथे संपतात....
तिथेच तर आपलं नातं सुरू होतं..
क्या बात है!!!
खूपच छान!!!
-अभी
laiiiiiiiiiiiiiiii bhari ha.....
Post a Comment